कोल्हापूर: राधानगरी येथील वक्रतुंड एज्युकेशन सोसायटी संचालित जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई), मुंबई यांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या संस्थात्मक अवलोकन प्रक्रियेत महाविद्यालयाला प्रतिष्ठेचे 'व्हेरी गुड' मानांकन प्राप्त झाले आहे. या यशाने संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यावर राज्यस्तरीय शिक्कामोर्तब झाले आहे.

एमएसबीटीईच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, अत्याधुनिक प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा, अध्यापन पद्धती, विद्यार्थी विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, पारदर्शक प्रशासन, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि एकूण व्यवस्थापन यांचे सखोल मूल्यमापन केले. या सर्व निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेने 'व्हेरी गुड' मानांकन मिळविले आहे.

या यशावर प्रतिक्रिया देताना प्राचार्य डॉ. शोभराज माळवी यांनी सांगितले की, हे मानांकन केवळ संस्थेचा सन्मान नसून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या सामूहिक परिश्रमांची पावती आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्याधारित अध्यापन, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था भविष्यातही कटिबद्ध राहील. सक्षम व रोजगारक्षम व्यावसायिक घडविणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेचे अध्यक्ष अभिजीत तायशेटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे महाविद्यालयाने अल्पावधीतच गुणवत्तेची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि परवडणारे व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून देणे, उद्योग क्षेत्राशी शैक्षणिक समन्वय वाढविणे आणि कौशल्यविकासाला प्राधान्य देणे या धोरणामुळे संस्थेने शिक्षण क्षेत्रात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. एमएसबीटीईकडून मिळालेले हे 'व्हेरी गुड' मानांकन संस्थेच्या शिस्त, आधुनिक शिक्षणपद्धती आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाला मिळालेली राज्यस्तरीय मान्यता मानली जात असून, राधानगरीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

Vijay Morbale, Kolhapur

Vijay Morbale, Kolhapur

पद: क्षेत्रीय संवाददाता (कोल्हापुर)

शिक्षा: बी.एससी (केमिस्ट्री), ग्रामीण पत्रकारिता एवं जनसंचार में पीजी डिप्लोमा

परिचय:

विजय गुंडू मोरबाळे महाराष्ट्र के कोल्हापुर क्षेत्र के एक समर्पित और अनुभवी जमीनी पत्रकार हैं। शिवाजी विश्वविद्यालय से बी.एससी (केमिस्ट्री) की डिग्री हासिल करने के बाद, उन्होंने पत्रकारिता के प्रति अपने जुनून को करियर में बदला। उन्होंने शिवाजी विश्वविद्यालय के 'ग्रामीण पत्रकारिता और जनसंचार' कोर्स में सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगुड) में प्रथम स्थान प्राप्त किया है, जो ग्रामीण और स्थानीय मुद्दों पर उनकी गहरी समझ को दर्शाता है।

कार्यक्षेत्र और विशेषज्ञता:

विजय मुख्य रूप से कोल्हापुर जिले के कागल, मुरगुड, अदमापुर और भुदरगड जैसे क्षेत्रों में सक्रिय हैं। 'निकाल न्यूज' जैसे प्रतिष्ठित डिजिटल प्लेटफॉर्म्स के माध्यम से स्थानीय पत्रकारिता में अपनी पहचान बनाने के बाद, अब वे 'प्रातःकाल' (pratahkal.in) के डिजिटल नेटवर्क से जुड़े हैं। वे स्थानीय राजनीति, सामाजिक सरोकार, अपराध (क्राइम) और क्षेत्र के ऐतिहासिक व धार्मिक मंदिरों से जुड़ी महत्वपूर्ण खबरों को सटीकता से जनता तक पहुँचाते हैं।

पत्रकारिता का दृष्टिकोण:

सकारात्मक और समाजोपयोगी पत्रकारिता में गहरा विश्वास रखने वाले विजय हमेशा उन खबरों को प्राथमिकता देते हैं जो समाज में बदलाव ला सकें। हाल ही में जून 2026 में, एक सेवानिवृत्ति समारोह में हार-फूलों की जगह अनाज इकट्ठा कर जरूरतमंदों को बांटने की एक अनूठी सामाजिक पहल को उन्होंने प्रमुखता से कवर किया था, जिसे काफी सराहना मिली।

ग्रामीण भारत की आवाज और स्थानीय विकास की खबरों को डिजिटल माध्यमों पर मजबूती से रखने के लिए विजय मोरबाळे लगातार प्रयासरत हैं।

Next Story