Pratahkal - News Update - Coastal Road and Milan Sabvechi Pahani across from the Chief Minister
पावसामुळे सांताक्रुझ, मिलन सबवे या सखल भागामध्ये पावसामुळे (Rain) दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत (Mumbai) सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची पावसात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मुंबईत ज्या सखल भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या ) राजू जहागीरदार, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या ) विभास आचरेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, मिलन सब-वे या भागात पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो. यावर्षी पाण्याचा निचरा करण्यासाठी हजारो लिटर क्षमतेचे वॉटर टँक कार्यान्वित करण्यात आले आहेत. सकल भागातील पाणी पंपिंग द्वारे उचलून साठवण टाक्यांमध्ये साठवण केले जात आहे. त्यामुळे येथे वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. याच धर्तीवर मुंबईतील इतर ठिकाणच्या सखल भागात सुध्दा अशी यंत्रणा कायान्वित करावी, असे निर्देश दिले. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन वॉर रुम मधील यंत्रणा मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाऊ लागू नये याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोडचे काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
पावसामुळे दोन कामगारांचा मृत्यू
पहिल्याच पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. गोवंडीमध्येही पहिल्याच पावसात पाणीच पाणी झाले होते. तुंबलेले पाणी काढण्यासाठी मॅनहोलमध्ये सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. सुधीर महेंद्र दास आणि रामकृष्ण निरंजन दास असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
Editorial

Editorial

Next Story