Vande Bharat Express
उदयपूर, (वृत्तसंस्था) : लोको पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे उदयपूर- जयपूर (Udaipur- Jaipur) सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसची (Vande Bharat Express) मोठी दुर्घटना टळली. वंदे भारत एक्स्प्रेसचा घातपात घडवण्याच्या उद्देशाने ट्रॅ कवर दगड-धोंडे ठेवले होते. अख्खी ट्रेन ट्रॅकवरुन उलटवण्याचा कट होता. मात्र लोकोपायलटच्या चाणाक्षपणामुळे मोठी दुर्घटना टळली. उदयपूर- जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोको पायलटला रेल्वे रुळावर मोठी दगडे आणि इतर गोष्टी दिसल्यानंतर त्याने तातडीने रेल्वे थांबवली. अन्यथा मोठा अपघात झाला असता. या घटनेची माहिती जीरआरपीला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उदयपूर ते जयपूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन सोमवारी चित्तोडगड जिल्ह्यातील सोनियाना गांगरार येथे पोहोचली. तेव्हा लोको पायलटला ट्रॅकवर दगड दिसले. दगड पाहिल्यानंतर पायलटने ट्रेनचे ब्रेक लावले. यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकावर याबाबत माहिती दिली. समाजकंटकांनी रुळांवर मोठमोठे दगड, बार टाकले होते. गाडी वेळेत थांबवली नसती तर रुळावरून घसरण्याची शक्यता होती. या अपघातामागे कोणाचे षडयंत्र आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.
Editorial

Editorial

Next Story